शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटला पाहिजे, सर्व ठिकठाक होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:55 IST

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव आणायचे असेल तर अंतर्गत वाद मिटला पाहिजे. मग सर्वकाही ठिकठाक होईल, असा साक्षात्कार नेत्यांना झालेला दिसतोय. या संदर्भातील पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर यांची ताजी वक्तव्ये बरंच काहीसांगून जातात. त्याच्यावर सध्या जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरूआहे.सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण बाबा गट व काका गट हा तसा खूप जुना वाद आहे. त्याला अनेक कारणांची फोडणी मिळाल्याने हा वाद वाढतच गेला आणि परिणामी त्याचा फटका जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला बसला, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आज तर जिल्ह्यात काँगे्रसचे फक्त दोनच आमदार दिसतात. ती संख्या वाढवायची असेल तर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत वाद मिटणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना कºहाड दक्षिणमधून माझी उमेदवारी हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता. तो समजून घ्यायला हवा होता, असे सांगत जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी आधी कºहाड दक्षिणेतील बाबा-काका गट हा वाद मिटला पाहिजे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोतले येथील कार्यक्रमात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही; पण काळजी करू नका.सगळे काही ठिकठाक होईल, असा जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बाबा-काका गटांतील वाद मिटून नजीकच्या काळात जिल्ह्यात काँगे्रस ठिकठाक होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.काकींनीच दिली काकांना उमेदवारीप्रेमिलाताई चव्हाण १९८४ मध्ये इंदिरा काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकर यांना कºहाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली, असे सांगितले जाते. त्यानंतर अनेक वर्षे प्रेमिलाताई काकी व विलासराव काका यांच्यात सलोख्याचे संबंध होते.... तर अटीतटीचा सामना झाला असतावास्तविक, १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हे एस काँग्रेसमधून आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार उभे होते बाळासाहेब शेरेकर. वास्तविक, त्यावेळी जयवंतराव भोसले यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी का नाकारली याबाबत आजही उलट-सुलट मते मांडली जातात. उंडाळकरांच्या विरोधात रेठरेकर उमेदवार असते तर ती निवडणूक अटीतटीची झाली असती.यापूर्वीही झाला होता वाद मिटविण्याचा प्रयत्नपृथ्वीराज चव्हाण यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ही बाब उंडाळकरांना साहजिकच पचनी पडणारी नव्हती. त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याने तेच कºहाड दक्षिणमधून लढणार, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही.पुन्हा एकदा प्रयत्न सुरूराज्यात व देशात जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यावे, असा राग आळवला जात आहे. त्यामुळे समविचारी पक्षांची मोट बांधत असताना काँगे्रसअंतर्गत मतभेदही मिटले पाहिजेत, अशा सूचना दिल्या गेल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवरील वादही मिटविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय उंडाळकरही काँग्रेस विचारधारेपासून दूर गेलेले नाहीत. हे त्यांनी गत सहा महिन्यांत सुशीलकुमार शिंदे व शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या घेतलेल्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होते. साहजिकच या साऱ्या बाबी बाबा व काका यांच्यातील वाद मिटविण्याचीच प्रक्रिया मानली जात आहे.